Lockdown 4.0 : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊन 3.0 चा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. आता लॉकडाऊन 4.0 ला सुरवात होणार आहे. 31 मेच्या मध्यरात्रीपर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.