आयुर्वेदाच्या मदतीने सर्दी-खोकल्यापासून दूर रहा, ‘हे’ करा घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – ऑक्टोबर महिना सुरू होताच उष्णता कमी होऊ लागते आणि हिवाळा सुरू होतो. यामुळे हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सर्दी, ॲलर्जीच्या समस्येमुळे बहुतेक लोक खोकला, ताप इत्यादीमुळे त्रस्त असतात. पतंजली आयुर्वेदचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार या ॲलर्जीपासून मुक्त होण्यासाठी काही आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन केले जाऊ शकते. आयुर्वेदाच्या मदतीने या ॲलर्जीपासून मुक्त कसे व्हावे हे जाणून घेऊ

१) श्वासारी क्वाथ
श्वासारी क्वाथचे सेवन केल्यास वर्षानुवर्षेच्या ॲलर्जीपासून मुक्तता मिळते. हे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, बद्धकोष्ठता, शरीरातील वेदना, अपचन, ब्रोंकाइटिस या श्वासा संबंधी समस्या दूर करतेच पण या सोबत दमा आणि कर्करोगापासून सुद्धा संरक्षण होते.

२) त्रिकुट चूर्ण
त्रिकूट चूर्णचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. आजार होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होतो. याद्वारे श्वासोच्छवासाच्या समस्येपासून मुक्तता होते. ॲलर्जी, खोकला, सर्दी, घशात दुखणे इत्यादींची समस्या दूर होते. भूक वाढण्याबरोबर पचन क्रिया अधिक मजबूत होते. फुफ्फुस चांगले काम करते. घरी तयार करण्यासाठी सुंठ, आले, काळी मिरची, मिरपूड समान प्रमाणात बारीक करा. चूर्ण सोबत २ ते ३ मधा सोबत सेवन करावे.

३) दूध हळद
अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल गुणधर्म असलेली हळद आणि दूध घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे सर्दी, खोकला, ताप घसा आणि पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. दररोजच्या आहारात हळद दूध पिणे गरजेचे आहे. हळद दुध तयार करण्यासाठी भांड्यात १ ग्लास दूध आणि एक चिमूटभर हळद घाला आणि २ ते ४ मिनिटे उकळी येऊ द्या. नंतर थंड करून घ्या. झोपायच्या आधी तयार केलेले दूध प्या.

४) गुळवेल चे पाणी
गुळवेलच्या पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. दररोज हे सेवन केल्याने हंगामी ताप, सर्दी – खोकला आणि ॲलर्जीपासून मुक्तता मिळते. यासह, आपणास आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. ते तयार करण्यासाठी, प्रथम गुळवेल धुवून घ्या आणि प्रत्येकी एक इंचाचे ५ तुकडे करा. नंतर गॅसच्या मध्यम आचेवर भांड्यात गुळवेल, २ कप पाणी घाला. १ चमचा हळद, तुळशीची पाने, १ तुकडा आले, गूळ किंवा मध चवीनुसार घाला. अर्धे होण्यापर्यंत पाणी उकळा. तयार केलेले पाणी थंड करून चाळणीच्या सहाय्याने काढून घ्या लक्षात ठेवा, एका दिवसात फक्त १ कप गुळवेलचे पाणी प्या.

५) आवळा
व्हिटॅमिन सी आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्याचे सेवन केल्याने शरीरातील ॲलर्जीची समस्या दूर होते. पचन प्रणाली मजबूत होते आणि रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणासह वजन कमी होते. दृष्टी वाढते. शरीराला सर्व योग्य घटक सहज मिळतात. आपण ते कच्चा, रस, मुरंबा किंवा लोणचे बनवून वापरू शकता.