SRA प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरे विकता येणार – जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून ५ वर्षांनी घरे विकता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सध्या इमारत बांधल्यानंतर ५ वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. बहुतांश प्रकल्प पूर्ण व्हायला ५ ते १० वर्षांचा अवधी लागतो. म्हणून झोपडी पाडल्यापासून ५ वर्षांनी SRA तील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

आव्हाड बोलताना म्हणाले, इमारत बांधल्यानंतरचा जो ५ वर्षांचा नियम आहे, तो नियम बदलून त्याची झोपडी पडल्यानंतर त्याला तो ५ वर्षानंतर विकता आला पाहिजे. कोणतीही SRA ची योजना ही १० ते १५ वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला १५ वर्षे लागतात आणि नंतर विकायला ५ वर्ष.
दरम्यान, SRA मधील विकलेल्या घरांसंदर्भात नोटीस पाठवली असुन, याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती देखील आखण्यात आली आहे. तर याबाबतचा नियम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत समितीचा लवकरच निर्णय होऊ शकतो. असे आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसेच या समिमतीमध्ये अनिल परब, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांचा समावेश आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच सर्व बीबीडी चाळीचं भूमिपूजन या महिन्यातच होणार आहे. ते भूमिपूजन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बीडीडी चाळीच्या बांधकामाला प्रारंभ होणार आहे. वरळी येथे आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील जो बीडीडीचा पट्टा आहे, तिथे उद्घाटन कार्यक्रम असेल. या बाबत मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत तसेच २०१६ रोजी झालेल्या या निर्णयाला आता गती येईल. आणि आगामी ३ ते ४ वर्षांत बीडीडी उभी राहील. अशी माहिती त्यांनी दिली आहे.