फक्त 10 रूपयांमध्ये ‘भेगा’ पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्यात तसेच इतरही ऋतूत अनेक जणांच्या पायाच्या टाचा कडक होतात आणि भेगा पडतात. यामुळे पायांना वेदना होतात व चालायला सुद्धा त्रास होतो. तसेच दिसायला देखील खराब वाटतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला पायांच्या टाचांना भेगा पडल्या तर कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता आणि पैसे घालवता पायांच्या टाचा पहिल्यासारख्या कशा करायच्या हे सांगणार आहोत.

१. लिंबू आणि वॅसलिन
सर्वात प्रथम एका वाटीमध्ये ५ ते ६ लिंबाचा रस काढून घ्या. मग त्यात एक चमचा वॅसलिन घालून मिक्स करुन घ्या. नंतर याची एक पेस्ट तयार होईल. एका बादलीत गरम पाणी करा. मग कोमट पाण्यात १५ ते २० मिनिटांसाठी या पाण्यात पाय घालून बसा. त्यानंतर पाय पाण्याबाहेर काढून चांगल्या मऊ कापडाने पाय पुसून घ्या नंतर वॅसलिन आणि लिंबाची पेस्ट पायांना लावून हलक्या हाताने चोळा. नंतर पाय धुवून टाका. एक आठवडा सतत हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या पायांच्या टाचा चांगल्या दिसतील. तसेच शक्य असल्यास झोपण्यापूर्वी हे मिश्रण लावा.

२. नारळाचं तेल
मुलायम त्वचेसाठी नारळाचं तेल हा चांगला आणि सोपा पर्याय आहे. अंघोळीच्या पाण्यातही नारळाचं तेल वापरलं तरी चालतं. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलानं टाचांना हलक्या हाताने मसाज करावी. तुमच्या टाचांमधून रक्त येत असेल किंवा टाचांना सूज येत असेल तर खोबरेल तेल सूज कमी करण्यास गुणकारी औषध समजलं जात. खोबरेल तेलात अँटीमिक्रोबियल गुण असतो. त्यामुळे दोन वेळा तुम्ही हलक्या हातांनी पायावर मसाज केल्यास फरक पडतो.

३. एलोवेरा जेल
एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप चांगलं समजलं जात. एलोवेरा जेलच्या वापरामुळे तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. त्याकरिता फक्त हातांवर एलोवेरा जेल घ्या. हलक्या हाताने पायांना टाचांना मसाज करा. दररोज हा प्रयोग केल्यास काही दिवसातच तुमच्या टाचा चांगल्या दिसायला लागतील. तसेच नेहमी सॉक्स वापरुन आपल्या पायांना झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा.