हैदराबाद : वृत्तसंस्था
दुस-याशी प्रेमसंबंध असतानाही घरच्यांच्या आग्रहामुळे तिला लग्न करावे लागले. पण हे पती तिला मान्य नव्हता. त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची सुपारी दिली व सुपारी म्हणून लग्नातील आंगठी हल्लेखोरांना दिली. हैदराबाद पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. लग्नानंतर १० दिवसातच पतीची हत्या तिने घडवून आणल्याचे उघड झाल्याने पोलिसही चक्रावून गेले.
हैदराबादच्या विजयनगरमध्ये राहणा-या एका सरस्वती नावाच्या महिलेने पर्वतीपूरम पोलीस ठाण्यात येऊन तिघा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या पतीचा मृत्यु झाला असून आपले दागिने लुटून नेल्याची तक्रार दिली. या तक्रारीत महिलेने आपण पती गौरीशंकरबरोबर स्कुटरवरुन जात होतो. त्यावेळी रिक्षातून तिघे जण आले व त्यांनी आम्हाला गाठून पतीला मारले व माझे दागिने चोरुन नेले असे सांगितले होते. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केल्यावर त्यांना घटनेमध्ये काही विसंगती जाणवू लागली. तेव्हा त्यांनी या महिलेकडे आणखी बारकाईने चौकशी करु लागले. तेव्हा ती गडबडुन गेली व तिने खरा प्रकार सांगितले.