मग पंकजा मुख्यमंत्री झाल्या तरी मला आनंद : सुप्रिया सुळे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे जर राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तरी मला चालेल. एकाधी धाडसी महिला जर राज्याचे नेतृत्व करायला पुढे येत असेल, तर आपल्याला आनंदच आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्याच्या वतीने त्रकार परिषदआयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बीडच्या सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलताना, ‘मी वाघीण आहे, मला राज्यभर सभेसाठी बोलावतात. असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता ‘कोणतीही धाडसी महिला राज्याचे नेतृत्व करत असेल, तर मला आवडेलच. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, राज्याचे राजकारण नक्की कोणती दिशा घेत आहे हे सामान्य जनतेला समजन्यापलिकडे असून, आगामी निवडणूकांचे पडघम वाजल्याने अनेक राजकीय व्यक्ती वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. असेही त्यानी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, सध्याचे भाजपा सरकार असंवेदनशील आहे. ५६ इंची छाती असतानादेखील पाकिस्ताने पुलवामा येथे हल्ला केलाच कसा. सरकारच्या अनेक योजना निष्फळ झाल्या आहेत. तसेच शेतीला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. याचबरोबर मुंबईत धनगर समाज आरक्षणाबद्दलची बैठक निष्फळ ठरली. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही. बारामतीत जेव्हा धनगर समाजाचे आंदोलन झाले, तेव्हाच हे फसवे आश्वासन असल्याचे मला जाणवले होते. भाजप सरकार केवळ कष्टकरी समाजाची फसवणूक करत आहे. चुकीचे काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात महाआघाडी करुनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, महारुद्र पाटील, अमोल भिसे आदी उपस्थित होते.