नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेआधी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिली होता. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावरून केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Union Minister Ramdas Athawale: Even after doing well for 5 yrs, some people tried to malign PM Modi's image. But people had decided that there was no alternative to Modi Ji. If Rahul Gandhi cannot manage his party well, how would he govern the country?As a result, he lost Amethi pic.twitter.com/pV65GLthzf
— ANI (@ANI) September 22, 2019
आज रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक मोदींवर टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधींना काँग्रेस सांभाळता आली नाही, तर देश काय सांभाळणार ? याची परिणती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली असे म्हणत आठवले यांनी राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यांनी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणी नुकतीच केली होती. मात्र, युतीच्या जगावाटपात एवढ्या जागा आरपीआयला सुटण्याची चिन्हे नाहीत. तर एवढ्या जागा मिळून महायुतीतील घटकपक्षांनाही मिळणार नसल्याची स्थिती आहे.
Visit :- policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा