चीनची भारताला पुन्हा धमकी, म्हणे – ‘युद्ध झाल्यास भारत जिंकणार नाही’

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय जवानांनी चिनी सैनिकांच्या प्रत्येक घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. लडाखमधील गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच चीनकडून दुहेरी भूमिका घेतली आहे. मॉस्कोतील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वे फेंग या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सीमा वादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही, आज घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे .

भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही असे म्हटले आहे. त्याशिवाय चिनी माध्यमाने शांततेचाही दिखावा केला आहे. दोन्ही देशांच्या सरंक्षणमंत्र्यामध्ये झालेल्या बैठकीत मार्ग निघेल. ही बैठक दोन्ही देशासाठी एक महत्वाची आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिथावणीखोर कृत्ये करू नयेत. नकारात्मक माहिती पसरवून वाद निर्माण न करता दोन्ही देशांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यावर भर देण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. सध्याची परिस्थिती निवळणे गरजेचे आहे. तसे झाले तरच शांतता प्रस्थापित होऊ शकेल असे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवत भारताला पाठींबा दिल्यामुळे चिनी मीडिया भडकली आहे.