इंडियन आर्मीनं चीनला शिकवला धडा ! कोणत्याही क्षणी येऊ शकते मोठी बातमी, जाणून घ्या संपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान व्हॅली जवळ चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय सैन्याने डेमचॉक आणि पॅंगॉन्ग तलावा जवळील गावे रिकामी केली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सैन्यासह मोठी शस्त्रे आणि दळणवळणाची साधनेही गॅलवान खोऱ्यात पोहोचू लागली आहेत. संपूर्ण क्षेत्रात मोबाइल फोन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आणि श्रीनगर-लेह महामार्ग लष्करी हालचालीमुळे बंद करण्यात आला आहे.

माहितीनुसार काही परदेशी गुप्तचर संस्थांनी खुलासा केला आहे की, खुद्द चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लडाखमध्ये भारतीय सैन्यासह संघर्षाचा आदेश दिला आहे. हेच कारण आहे की, रक्तरंजित संघर्षानंतरही भारताच्या वतीने मेजर जनरल स्तरावरील चर्चाही कोणताच निष्कर्ष न घेता संपली.

हा घटनाक्रम लक्षात घेता भारत सरकारने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर कारवाई करण्यासाठी सैन्याला सूट दिली आहे. लष्कराच्या मुख्यालयातून फ्रंटल पोस्टच्या कमांडर्सना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा नाश करण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते. फ्रंटल पोस्ट कमांडर्सना सांगितले गेले आहे की, परिस्थितीचा आढावा देऊ नका आणि नंतर आदेश मिळण्याची प्रतीक्षा करू नका. काही विचित्र परिस्थिती उद्भवल्यास आपल्या विवेकबुद्धीनुसार कारवाईला उत्तर द्या. भारत सरकारच्या विविध सुत्रांकडून ही माहिती देखील मिळाली आहे की, यावेळी चिनी सैन्य भारतीय हल्ल्याचा सामना करण्यास सक्षम नाही.

म्हणूनच चीन सरकारच्या मुखपत्र ग्लोबल टाईम्सने भारताविरूद्ध मानसिक युद्ध पुकारले आहे. या वेळेचा अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी भारताने चीनविरुद्ध युद्ध करण्याचा किंवा युद्धासारखी तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कोणत्याही देशातील सैन्य त्याच वेळी वाहतूक आणि संप्रेषणाच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवते, जेव्हा ते शत्रूवर हल्ला करणार असतील किंवा शत्रूकडून आक्रमण होण्याची शक्यता असते. सध्या चीन भारतावर हल्ला करण्याच्या स्थितीत नसल्याचे काही परदेशी युद्ध तज्ञांचे म्हणणे आहे. यावेळी जर युद्ध झाले तर दोन दिवसांत चीनचा दारुगोळा व शस्त्रे संपतील.