…म्हणून PM मोदींना आंबे कसे खाता असा प्रश्न मी विचारला होता, अक्षय कुमारनं केला ‘खुलासा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – अक्षय कुमार या बॉलिवूड अभिनेत्यांने पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखत कदाचितच कोणी विसरलं असेल. या मुलाखतीत अक्षयने मोदींना विचारलेला प्रश्न, तुम्ही आंबे कसे खातात हा तर आज देखील आठवला तर तुम्हाला हसू येत असेल. या प्रश्नामुळे अनेक राजकीय नेत्यांनी अक्षय कुमारवर टीकेची झोड उठवली.

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घ्यायला तयार नव्हते, त्या काळात अभिनेता अक्षय कुमार ने मोदींची ही मुलाखत घेतली होती. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत अक्षयने पंतप्रधान मोदींना राजकीय नाही तर वैयक्तिक जीवनाशी संबंधित खासगी प्रश्न विचारले होते. याचं वेळी मनमोकळ्या गप्पा मारताना अक्षयने मोदींना प्रश्न विचाराला की तुम्ही आंबे कसे खातात, कापून की चोखून. हा प्रश्न सोशल मिडियावर इतका ट्रोल झाला की, अक्षय कुमार सर्वांनी हसू केलं. त्यानंतर आता हा प्रश्न आपण का ? विचारला होता. याचं स्पष्टीकरण अक्षय कुमारनं इतक्या दिवसांनी दिलं आहे.

अक्षय कुमारनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे उत्तर दिलं. तो म्हणाला की, मी पंतप्रधान मोदींना तुम्ही आंबा कसा खातात हा प्रश्न विचारल्याने मला ट्रोल केलं गेलं. परंतु मी यामध्ये संशोधन काय करायचं, माझ्या जे मनात आलं ते मी त्यांना विचारलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी आंबा खाऊ शकत नाही का? मजा मस्तीत बोलू शकत नाहीत का? असा उलट सवाल त्यांने नेटकऱ्यांना विचाराला.

अक्षय कुमारने घेतलेल्या या मुलाखतीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. अक्षयनं मोदींना काय प्रश्न विचारला तर आंबा कसा खातात. हा प्रश्न विचारण्याची कुठल्याही पत्रकाराची हिंमत झाली नसती. हा काय पंतप्रधानांना विचारायाचा प्रश्न आहे का. चोखून खाता का, कापून खातात? काय मस्करी लावली आहे का? इथं जनता सरकारवर अवलंबून आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवर टीकास्त्र डागलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/