नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच नवनवीन उपाययोजना करत असतात. त्यात सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेने १ एप्रिलपासून PNR संबंधित नियमात बदल केला असून, नवीन नियमानुसार, जर तुमची ट्रेन सुटली तरी ट्रेनचे तिकिट कॅन्सल रिफंड मिळवणे सोपे झाले आहे. याशिवाय रेल्वे बोर्डिंगशी संबंधित नियमही बदलले आहेत.
Missed your second train as the first train was running late? Get your money back under #IRCTC's new initiative that allows passengers to link PNRs for connecting trains; enabling easy & quick refunds. For info, visit https://t.co/e14vje72Y3 pic.twitter.com/6mh5WhGge3
— IRCTC (@IRCTCofficial) November 1, 2019
PNR संदर्भात बदलेले नियम –
– IRCTCने ट्विटद्वारे सांगितल्याप्रमाणे प्रवासादरम्यान दोन PNR प्रवाशांना एकत्र जोडले जातील. आता दोन्ही IRCTC ‘ई-तिकिट’ आणि PNR काउंटर तिकिट एकाच वेळी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– आतापर्यंत दोन PNR एकत्र लिंक नसल्यामुळे प्रवाशांना ट्रेन सुटल्यास परतावा मिळू शकत नव्हता. या नव्या नियमानुसार दोन PNR एकत्र जोडली गेल्याने जर पहिल्या ट्रेनला उशीर झाला तर पैसे कट होऊन मिळतील, तर दुसरी ट्रेन सुटल्यावर पैसे वेळेत परत केले जाणार आहे.
– त्यासाठी पहिल्या तिकिटाचे गंतव्यस्थान आणि दुसर्या तिकिटातून प्रवास सुरू करण्याचे ठिकाण एक असले पाहिजे.
Visit : Policenama.com
शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या