भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. बालाकोट, चकोटी, मुज्जफराबाद या तीन ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. भारताच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी या तीन ठिकाणी १ हजार किलो बॉम्बफेक करुन ही कारवाई केली आहे.

पहाटे साडेतीन वाजता केलेल्या या हल्ल्यात भारताची सर्व विमाने आपले ठरलेले लक्ष्य साधून काही मिनिटातच परत सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परत आली आहेत. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद याच्या कॅम्पचे किती नुकसान झाले, याची काही काळानंतरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला