अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल ट्रेन सुरू कराव्यात : जितेंद्र आव्हाड

पोलीसनामा ऑनलाइन टीम लॉकडाउन शिथिल करण्यात आले असून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोनामुळे मागील सव्वा दोन महिन्यांपासून मुंबईत लोकल बंद करण्यात आली आहे. मात्रा, अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना पृवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेंसाठी काही प्रमाणात ट्रेन सुरु करायला हव्यात. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत.

केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.