‘महाभारत’मध्ये कर्णाचं निधन ! लोक चक्क सोशल मीडियावर रडले

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर आणि बी आर चोपडा यांच्या रामायण आणि महाभारत या मालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकदा सोशल मीडियावर याबद्दल चर्चाही होताना दिसत आहे. अलीकडेच एका एपिसोडमुळं याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

सध्या मालिकेत कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू आहे. यात कर्णाचं निधन दाखवण्यात आलं. हीच गोष्ट लगेच सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसली. हा सीन पाहून अनकेजण भावूक झाले आहेत. कर्ण सर्वोत्कृष्ठ योद्धा होता अशा आशाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://twitter.com/nitinsingh188/status/1259752034456211456

या सीनवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, कर्णाचा मृत्यू पाहून कृष्णही रडला. आणखी एकानं लिहिलं की, महाभारतमधील त्रास देणाऱ्या सीनपैकी हा एक आहे. कर्ण एक योद्धा होता. इतरही अशा अनेक कमेंट आहे ज्या भावूक होऊन केलेल्या आहेत. रथाच चाक अडकल्यानं ते नीट करताना अर्जुन युद्धाचे नियम झुगारून त्याला मारतो हे पाहून सर्वच इमोशन झाले आहेत.

कर्णाच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर पंकज धीर यांनी ही भूमिका साकराली होती. त्यांच्या अनेक भूमिकांपैकी चाहत्यांना त्यांची ही भूमिका खूप आवडते.