शिवसेनेचा पुन्हा एकला चलो रे चा नारा

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन

स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर ज्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकते त्या तीन जागांवर उमेदवार दिले असून, स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेशच ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच सीमा भागातील मतदारांनी दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे असे आवाहन करत सीमा भागात शिवसेना उमेदवार देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत काय घडलं ते जनतेने बघितलं आहे, त्याबाबत सध्या भाष्य करणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या परिवाराकडे भाजपकडून दुर्लक्ष झालं , म्हणून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय वनगा कुटूंबियांनी लोकसभेसाठी जागा मागितली तर त्यांना उमेदवारी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.