नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एका प्रेमीयुगलाला लपून छपून भेटणे फार महागात पडले आहे. हे दोघे एकमेकांना लपून भेटत असताना त्यांना गावकऱ्यांनी पकडले आणि त्यांचे जबरदस्ती लग्न लावून देण्यात आले. बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील कोन्हीया गावात हि घटना घडली. मंगळवारी रात्री हि घटना घडली असून हा प्रियकर आपल्या. प्रेमिकेला भेटण्यासाठी कोन्हीया गावात आला होता.
मात्र जेव्हा गावकऱ्यांना या गोष्टीची कुणकुण लागली त्यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या प्रेमीला बंधक बनवत बांधून ठेवले. त्यानंतर गावात पंचायत बोलावण्यात आली आणि पंचानी या दोघांचे लग्न लावून देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्यावेळी पंचायतीने प्रेमिकेला या निर्णयाविषयी विचारले त्यावेळी तिने देखील या लग्नासाठी तात्काळ होकार दिला. आणि अशा प्रकारे त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
दरम्यान, हि सर्व घटना घडत असताना त्याठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते. पंचायतीने हा निर्णय पोलिसांच्या उपस्थितीत सुनावला. मात्र पोलिसांनी यावर कोणताही आक्षेप न घेता दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
- पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्या असेच ५ फायदे
- किडनी डॅमेज आहे का ? फक्त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्ट करून समजू शकते
- कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्या याचे ८ फायदे
- सकाळी लिंबूपाणी पिल्याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
- कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया
- ‘हे’ आहेत लिव्हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
- शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी
- शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक