Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…
जालना : Manoj Jarange Patil-Maratha Community | जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपली मतंही फुटतील. त्यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले, आपल्याला त्यांचा काही फायदा होत नाही. आपले आरक्षण दिल्लीत नाहीच, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले. आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जरांगे बोलत होते. (Maratha Reservation)
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाज मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणार होता. ते अडचणीचं झालं असतं. मराठा समाजाला त्यांची शक्ति दाखवायची असेल तर उमेदवारही तुम्हीच द्या. पुढचा निर्णय ३० तारखेला जाहीर करु. मी राजकारणात उतरणार नाही. कारण तो माझा मार्ग नाही. कुणाच्या पक्षाला निवडा किंवा भाजपाला पाडा हे काही मान्य नाही. (Manoj Jarange Patil-Maratha Community)
मनोज जरांगे म्हणाले, एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा म्हणजे ताकद दिसेल. पण मराठा व्होट बँक काय आहे ती ताकद दाखवून देणार. लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकतं.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचे नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. जर सर्वांचे मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे.
तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वांना मान्य आहे का? याची चर्चा करावी.
त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा टाकू.
दरम्यान, दुसरा पर्याय म्हणून मनोज जरांगे यांनी, कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या
नेत्याकडून लेखी लिहून घ्या की त्याचा सगेसोयरे कायद्याला पाठिंबा राहील.
पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याने जरांगे यांनी हा पर्याय सोडून दिला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी