MLA Bachchu Kadu | ‘काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर…’, राहुल गांधींच्या ‘मातोश्री’ भेटीवर बच्चू कडूंचा उपरोधात्मक टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leaders Rahul Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र (Maharashtra Political News) दौऱ्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडूंनी (MLA Bachchu Kadu) देखील राहुल गांधींवर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राहुल गांधींना संजीवनी मिळेल, असा उपरोधात्मक टोला बच्चू कडूंनी (MLA Bachchu Kadu) लगावला आहे.
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याची चर्चा आहे. असे झाले तर मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिले नेते ठरतील. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Elections) चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राहुल गांधी यांना संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच ते मातोश्रीवर येत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून संजीवनी मिळेल अशी अपेक्षा राहुल गांधींना आहे.
परंतु, राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेनंतर जो फरक सामान्य माणसांवर पडला पाहिजे होता,
तो फरक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील पडला नाही.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणा पडला नसेल तर जनतेवर कसा पडणार?
असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला.
तसेच, शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत उपरोधात्मक टोलाही बच्चू कडूंनी लगावला.
Web Title :- MLA Bachchu Kadu | bharat jodo yatra will not only affect the congress workers what will happen to the people mla bachhu kadu
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update