मराठी कामगारांना कामावरून काढल्याने मनसेचा आक्रमक पवित्रा 

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन 

मुंबईतील अंबरनाथ येथील एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये तडकाफडकी तीन मराठी माणसांना काढून टाकल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयडीसीतल्या एएसबी या जपानी कंपनीने काही दिवसांपूर्वी तीन मराठी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणी आज (गुरुवार) मनसेने कंपनीवर धडक दिली.

अमेरिकेत गणपती बाप्पाचा अपमान

अनेक वृषापासून या कंपनीमध्ये काम करणाऱ्या या तीन कामगारांचा परफॉर्मन्स चान्गला नसल्याचे कारण कंपनीने पुढे करीत त्यांना  तडकाफडकी कामावरून काढून टाकले . या घटनेननंतर या कामगारांनी मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली . यानंतर आज (गुरुवार) मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीतील कंपनीविरोधात मनसेनं ही धडक दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b903aef2-bd80-11e8-9673-7f57f78684f7′]
मनसेनं कंपनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जोपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या देण्याचा पवित्रा घेतला. यानंतर मनसेकडून कंपनी प्रशासनाला २४ तासांची मुदत देण्यात आली. येत्या २४ तासात जर कामगारांना परत कामावर घेण्यात आलं नाही, तर मनसे स्टाईलने कंपनीला धडा शिकवण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY,B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aab1748c-bd80-11e8-a157-efcc6f91c296′]