‘मोदी भक्त कधी देशभक्त असू शकत नाहीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी भक्त हे कधी देशभक्त असू शकत नाहीत. तसेच देश भक्त हे कधीच मोदी भक्त होणार नाहीत असे वक्तव्य करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. मोदी भक्त हे कधी देशभक्त असू शकत नाहीत. तसेच देश भक्त हे कधीच मोदी भक्त होणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही देश भक्त आहात की मोदी भक्त हे तुम्हाला ठरवावे लागेल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतकेच नाही तर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले  आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटनंतर  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी देशाचा अवमान केला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान या ट्विटवरून सुरू झालेला वाद थांबत नाही तोच केजरीवाल यांनी केंद्र सरकराने दिल्लीत शाळा बंधण्यापासून रोखल्याचा आरोप ट्विटरवरून केला.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1089787087061164033
दरम्यान केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मोदी सरकारने दिल्लीमध्ये शाळांचे बांधकाम रोखले. लढल्या झगडल्यावर चार वर्षांनंतर कुठे आज 11 हजार वर्गखोल्यांचे काम सुरू झाले आहे. आता तुम्ही मुलांवर प्रेम करायचे की मोदींवर याचा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तर ‘आप’ला मत द्या. मोदींना मत दिल्यास ते पुन्हा शाळांचे बांधकाम रोखतील.