मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे यांनी आपला जीव गमावला. असा प्रकार अजून कोणी करू नये म्हणून गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगा आणि कोणीही जीवावर उदार होऊ नका, असेही त्यांनी सूचित केले आहे.
[amazon_link asins=’B01GZPDV2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3dc5bb1d-8ff8-11e8-9a1a-87977b85f68b’]
इतकेच नव्हे तर ६०५ कोर्सेससाठी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच गडकिल्ले संवर्धन व इतर सर्वच मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार काम करत आहे. मराठा आरक्षणासाठीही राज्य सरकार अनुकूल आहे. लोकशाहीत आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करुन घेण्यासाठी, म्हणणे मांडण्यासाठी आंदोलनाचा हक्क असतोच पण त्यासाठी अनमोल प्राण गमवावे लागणे हे शासन व आंदोलनकर्ते अशा दोघांसाठीही दुर्दैवी आणि दुःखद आहे, असेही गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.