मुंबईत ढगाळ वातावरण; उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 10 डिसेंबर : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे. मुंबईत आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहिल असे, सांगण्यात येत आहे. तर, उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे, यांचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल, तसेच 11, 12 आणि 13 जानेवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्हयांना इशारा दिलाय, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलीय.

दोन दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे बुधवारी मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी मात्र, यात आणखी भर पडलीय. परिणामी मुंबई दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविले आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत आहे. गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल व किमान तापमानात वाढ नोंदविले आहे.

विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानामध्ये कमालीची वाढ नोंदविली आहे. बुधवारी मुंबईचे कमाल तापमान 36 अंश नोंदविले आहे. देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झालीय.

दुसरीकडे राज्याच्या वातावरणात देखील उल्लेखनीय बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा दिलाय, असे असतानाच 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविलीय.

तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पालघर येथील कमाल तापमान 24 ते 26 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविला आहे.

बुधवारी मुंबईत नोंदविलेले 36 अंश सेल्सिअस हे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 3 अंशांनी अधिक होते. परिणामी, कधी थंडी तर कधी ऊबदार असे वातावरणात बदल होत आहे. हाच कित्ता आणखी दोन दिवस गिरवला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.