Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…
मुंबई : Nana Patole On Election Commission | गुजरातमध्ये एकाच टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी इतर काँग्रेस नेतेही उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी? जर निवडणूक आयोगच एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागू लागला, तर ही धोक्याची घंटा आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी २० मार्च ते ४ जून कालावधीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा ७ टप्प्यात निवडणुका होत आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होईल.
१९ एप्रिल ते २० मे पर्यंत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात
५ टप्प्यात मतदान ठेवल्याने काँग्रेस नाराजी व्यक्त केली आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीदेखील नाराजी व्यक्त
करत निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्रात पाऊस नाही, बर्फ पडत नाही, दळणवळणाच्या
सर्व सुविधा आहेत, दंगली होत नाहीत, मग पाच टप्प्यात निवडणूका का, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन