मंत्री धनंजय मुंडे झाले भावुक, म्हणाले – ‘…म्हणून असं काही माझ्यासोबत घडतंय’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील, असं वाटलं होतं पण राजकीय मैदानात हरवता येणे शक्य नाही त्या वेळेस माझ्या सोबत झालं ते होतंय. जोपर्यंत मायबाप जनतेच्या मनात विश्वास आहे म्हणून कुणी कितीही काही केलं तरी तुमच्या आशिर्वादाने काहीच होणार नाही, असं वक्तव्य करत वादग्रस्त शर्मा प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर भाषणात टिप्पणी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलत असताना कल्पना शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केलं. जो व्यक्ती 1 हजार लोकांसमोर बोलला लाख माणसाच्या सभेत बोलला त्या व्यक्तीला काय बोलावे प्रश्न पडावा, अशी माझी अवस्था झाली आहे. आज माझ्या जन्मगावात बोलतोय. राज्यातील राजकीय जीवनातील भाषणाचे मुल्यमापन गावातील भाषणात करु नये, अशी विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

मुंडे साहेबांएवढा मी मोठा नाही
माझ्याकडून तुमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी मुंडे साहेबांसारखं काम कराव, असं वाटतं. काहींना वाटत मी अण्णा सारखं वागावं. मात्र, मी एवढा मोठा नाहीये या गावाने मागितलं काहीच नाही. स्व. मुंडे साहेब, स्व. आण्णा यांच्या कामाशी अनेकजण माझी तुलना करतात पण खरंतर मी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळपास सुद्धा नाही. नावाला शोभेल असं गावासाठी करण्याची आता सुरुवात केली आहे, असे मुंडे यांनी सांगितलं.

नालायक नाही तर लायक आहे म्हणून…
अनेक कठीण काळातून मी गेलो आहे. असा संघर्ष माझ्या नशिबी का आला, भगंवंताला हात जोडून आभार मानतो. तू संकटं आणली म्हणून मी इथपर्यंत आलो. इमानदारीने काम केलं. आता लोक प्रेमाने भाऊ बोलता, अगोदर धन्या शिवाय बोलत नव्हते. नालायक नाही तर लायक होतो म्हणून आज हा सत्कार करत आहात माझा पुनर्जमावर विश्वास नाही. तरी होत असेल तर पुनर्जन्म द्याचा असेल तर नाथऱ्याच्या मातीत दे, अशी मागणी ग्रामदैवताला मागितली.

स्व. मुंडे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे यासाठी काम केलं
गावातील आताची पिढी गावा बाहेर राहात आहे. मात्र मी मझ्या आयुष्याचा शेवट नाथरा गावात घालवेल, गावाचं आणि स्व. पंडित अण्णाचे नातं होतं. त्यांना सर्वात जास्त नाथऱ्यात करमायचं, आमच्या शिक्षणासाठी परळीत घर केलं पण अण्णा रोज चार तास गावात यायचे. मी लहानाचा मोठा तुमच्या देखत झालो. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावं यासाठी आम्ही काम करणारी माणसे कधी स्वप्नात पहिलं नव्हतं इथपर्यंत पोहोचलो, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.