मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सुदृढ शरीर असलेली तरुणाईच उपयोगी : CM देवेंद्र फडणवीस
पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वामी विवेकानंद म्हणाले होते. की कालीमातेची पूजा करताना ताजी आणि टवटवीत फुले वापरली जातात. कोमेजलेली फुले आपण वापरत नाही. तर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सुदृढ शरीर असलेली तरुणाईच उपयोगी असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
बिबवेवाडी येथे ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्ती दत्तक घेण्यात आले आहे.
त्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो, तो मनाने असतो. तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो. मनात उमेद, उभारी, हिंमत, ताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानात जाण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा
पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत
‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’
VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’