मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत असते. आता विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेमुळे मुंबई विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. या कवितेत आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान असल्याचा दावा आदिवासी महासंघाने आणि काही विद्यार्थ्यानी केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच या तक्रारीत कवी दिनकर मनावर यांच्यासह प्रकाशकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c709dbe-c3d5-11e8-94f0-118c379cec2e’]

कवि दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या काव्यसंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएच्या मराठीच्या पुस्तकात आहे. या कवितेतील ओळींमधून विविध प्रकारे पाण्याला उपमा देण्यात आली आहे. अशाच एका ओळीत अश्लिल विधान असून त्याला आदिवासी मुलीचा संदर्भ देण्यात आला आहे. हे लिखाण समाजाच्याच नव्हे तर समस्त महिलांच्या भावना दुखावणारे असल्याने ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

[amazon_link asins=’B071JWBFDT,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d01f300-c3d5-11e8-b969-bb61b77ca3a5′]

दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी या तक्रारीची दखल घेतली असून अभ्यासक्रम मंडळाची लवकरात लवकर बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघण्याची आशा आहे. मात्र, तरीही याप्रकरणी मुंबई विद्यापीठाला जाब विचारण्यासाठी सोमवार, १ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे, सूत्रांकडून समजते आहे.