भारत सरकारने लोकसंख्या कमी करण्यासाठी सातत्याने घेतलेल्या उपक्रमाला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे या अहवालावरुन दिसून येत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने जन्मदरात चीनला मागे टाकले आहे. अशाच पद्धतीने ही लोकसंख्या वाढत गेली तर काही वर्षात भारत लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकेल.
२०१९ मध्ये युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा तिसावा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने युनिसेफच्यावतीने जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहेत. या कराराअंतर्गत प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल.
युनिसेफच्या कार्यकारी उपसंचालक पेट्री गॉर्निज्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण प्रत्येक मुलाला जन्मानंतर जगण्याचा हक्क बहाल करण्याचा संकल्प करायला हवा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात एकूण ३ लाख ९५ हजार ७२ बालकांचा जन्म झाला. यांपैकी ९८ हजार ७६८ मुले ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत. पाकिस्तानमध्ये १ जानेवारी रोजी १५ हजार ११२ तर बांगलादेशमध्ये ८ हजार ४२८ बालकांचा जन्म झाला आहे.