भारताचा पाकिस्तानवर ‘सायबर स्ट्राईक’ : भारतीय हॅकर्सकडून एवढ्या साईट हॅक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ला होऊन दोन दिवस झाले. यानंतर आता  भारतीय हॅकर्सकडून  पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला आहे.  भारतीय हॅकर्सने  पाकिस्तानच्या जवळपास २०० हून अधिक वेबसाइट्स हॅक केल्याचं समोर आलं आहे. भारतीय हॅकर्सच्या एका गटानं(टीम आय-क्रूद्वारा) या वेबासाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचं निदर्शनास येतं आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.

हॅक करण्यात आलेल्या पेजवर अनेक मेसेज लिहिलेले दिसत आहे.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली असे मेसेज दिसत आहे.  १४-०२-२९१९ चा हल्ला आम्ही विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही. अशा प्रकारचे मेसेज पेजवर दिसत आहेत. याशिवाय, तुमच्यानुसार, देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट, असाही मेसेज या हॅक करण्यात आलेल्या पेजवर पाहायला मिळत आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती. परंतु सध्या पाकिस्तानवर झालेला हा सायबर हल्ला पाकिस्तानी सायबर जगतातला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी (दि- १४) भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. त्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत.  त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. व्यापाऱ्यांनीही आज बंदची घोषणा दिली आहे.