धार्मिक कार्यक्रमातील ‘प्रसादा’च्या अन्नातून विषबाधा

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाइन

आजरा तालूक्यातील होन्याळी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद खाल्याने अन्नातून 40 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही विषबाधा आंबील आणि घुगऱ्यांच्या प्रसाद खाल्याने झाल्याचे समजत आहे.

ही घटना आज सकाळी (शुक्रवार, 25) घडली असून विषबाधेमुळे तब्बल 40 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारसाठी नेण्यात आले असून त्यांच्यावर उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.