सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री सह आरोपी होतील : प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

भिडेंच्या माध्यमातून सरकार दंगली घडवून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला असून, भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजित पाठील सह आरोपी होतील असे वक्तव्य देखील त्यांनी केले. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.
[amazon_link asins=’B07F23BWLZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb800ea0-8386-11e8-b964-216c554071ff’]

भिडे गुरुजींचे वक्तव्य एक प्रकारे सरकारकडून संरक्षण दिल्यासारखे आहे. संत आणि वैदिक परंपरा या वेगळ्या असून भाजप भिडेंच्या माध्यमातून आपल्यावर वैदिक परंपरा लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांसाठी आम्ही काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. लोकसभेसाठी १२जागा देण्यात याव्यात अशी मागणी आपण काँग्रेसकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस हा पक्ष म्हणून राहिला नसून त्यावर एकाच कुटुंबाचा ताबा आहे. केंद्रीय स्तरावर भाजप विरोधात महाआघाडी अस्तित्वात येईल, असे वाटत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
[amazon_link asins=’B0764BFTPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c8dbfd5-8387-11e8-b40e-458ab3c880ec’]