एल्गार परिषदेच्या त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पूर्णवेळ पोलीस अधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याच्या तपासासाठी पूर्ण वेळ पोलीस अधिकारी देण्याचा निर्णय शहर पोलीस दलाने घेतले आहे. या गुन्ह्यांचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना पूर्ण वेळ तपास करण्यासाठी इतर कामातून मोकळीक दिली आहे.

[amazon_link asins=’B0795Z7MH7,B07F5YKHL2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ecd505ee-ae6a-11e8-a9df-a5547e6ab833′]

डॉ. शिवाजी पवार हे स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे एल्गार परिषदेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करत असताना एल्गार परिषदेच्या आडून शहरात माओवादी विचार पसरविण्याचा हेतू उघड झाला व परिषदेच्या आयोजनासाठी माओवादी संघटनांकडून पैसा पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला पुणे पोलिसांनी देशभरातील विविध शहरात छापे घालून जून मध्ये पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात यामागील देशव्यापी कट पुढे आला. राजीव गांधी यांच्या प्रमाणे एखाद्या वरिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, ई मेल, पेनड्रॉईव्ह, हार्ड डिक्स जप्त केल्या आहेत. बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संपर्क करताना त्यांच्या थिंक टँकने कोडलॅग्वेजचा वापर केला आहे. सुरुवातीला अटक केलेल्यांवर दोषारोपपत्र दाखल करण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. त्याशिवाय नुकताच अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे या न्यायालयातील तारखांना उपस्थित राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना जावे लागणार आहे. या गुन्ह्याचा तपास बारकाईने व्हावा, यासाठी शिवाजी पवार यांना त्यांच्या कडील इतर जबाबदाऱ्या काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वारगेट सहायक आयुक्तपदी विशेष शाखेचे रवींद्र रसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.

रवींद्र रसाळ यांची स्वारगेट विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती

जाहिरात