Raj Thackeray | बाळासाहेबांना भारतरत्न घोषित करण्याची राज ठाकरेंची मागणी, म्हणाले – ”तमाम हिंदूंची अस्मिता जागृत…”
मुंबई : Raj Thackeray | पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray )
आज मोदी सरकारने नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एमएस स्वामिनाथन यांना सर्वोच्च भारतरत्न सन्मान जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांनी या संदर्भात मागणी केली आहे. ‘एक्स’वर एक पोस्ट करत ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आला आहे अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि
भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला.
ह्या यादीतले एस. स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या
शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता, अशी खंत देखील ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
मौजमजेसाठी मोबाईल व चैन चोरणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक
पुणे : बाललैंगिक कायदा व बलात्कारातील आरोपीची निर्दोष मुक्तता
तरुणीचा पाठलाग करुन भररस्त्यात मारहाण, कोंढवा परिसरातील घटना