Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात (Rajiv Gandhi Case) जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि आरपी रविचंद्रन (RP Ravichandran) यांची सुटका करण्याचे आदेश आज (दि.11) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणात (Rajiv Gandhi Case) 30 वर्षांहून अधिक काळ हे आरोपी जेलमध्ये होते. त्या आधारावरच त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील (Rajiv Gandhi Case) जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन सुटकेची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. नलिनी यांनी 17 जून रोजी मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) दिलेल्या आदेशाला आव्हान दिले. मुदतीपूर्वी सुटकेची याचिका फेटाळून लावली होती.

सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी ए जी पेरारिवलन (A G Perarivalan) याची 18 मे रोजी सुटका केली होती.
पेरारिवलन याने राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात 30 वर्ष शिक्षा भोगलेली आहे.
पेरारिवलनने संविधानातील कलम (Article in the Constitution) 142 चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती.
दोषी नलिनीने पेरारिवालनच्या याच सुटकेचा दाखल देत तिच्याही सुटकेची मागणी केली होती.

 

Web Title :- Rajiv Gandhi Case | rajiv gandhi assassination case supreme court directs release of convicts including nalini srihar rp ravichandran

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण