RBI | अन्नधान्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ महागाई नियंत्रणासाठी जोखिम : आरबीआय गव्हर्नर

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे Reserve Bank of India (आरबीआय – RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी खाद्यपदार्थांच्या किमतीमधील वाढीला, महागाई (Inflation) रोखण्याच्या मार्गातील जोखिम म्हटले. असे धक्के कमी करण्यासाठी पुरवठा सुधारण्यासाठी कालबद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. (RBI)

ललित दोशी स्मृती व्याख्यानात (Lalit Doshi Memorial Lecture) ते बोलत होते. दास म्हणाले, भाजीपाल्याच्या किमतीतील वाढीचा धक्का अल्पकालीन आहे आणि आर्थिक धोरण सध्याच्या धक्क्याचे प्रारंभिक परिणाम कमी करण्यासाठी प्रतीक्षा करू शकते.

ते म्हणाले, रिझर्व्ह बँक (RBI) याची काळजी घेईल की, या धक्क्यांच्या दुसऱ्या फेरीचे परिणाम समोर येणार नाहीत. अन्नाच्या किमतींमध्ये वारंवार होणाऱ्या वाढीचा धक्का महागाईच्या अपेक्षा स्थिर करण्यात जोखिम निर्माण करतो. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढीचे सत्र सप्टेंबर २०२२ पासून सुरू आहे.

या सोबतच, त्यांनी पुरवठ्याशी संबंधित सतत आणि वेळोवेळी हस्तक्षेप करणे अशा धक्क्यांची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले.

ते म्हणाले की, आरबीआय महागाई ४ टक्क्यांवर ठेवण्याच्या लक्ष्यासाठी कटिबद्ध आहे. देशात उच्च व्याजदर दीर्घकाळ राहणार आहे.

आरबीआयने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून महागाई वाढल्यानंतर व्याजदरात
सातत्याने वाढ करून तो ६.५० टक्क्यांवर आणला. आरबीआयने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mental health | Perfect बनण्याच्या अट्टाहासात लोक होत आहेत मानसिक आजारी, जाणून घ्या ब्रेन कसा ठेवावा हेल्दी!

Ear Infection Increases During Monsoon: Here’s How You Can Deal With It Naturally

24 August Rashifal : कर्क आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकते मोठी डील फायनल करण्याची संधी, वाचा १२ राशींचे दैनिक भविष्य

How To Reduces Belly Fat | उपवास केल्याने पोटाची चरबी जलद वितळते का? वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किती योग्य, जाणून घ्या एक्सपर्टचे मत