मंत्रीमंडळातून फेरबदलात मिळणार चार मंत्र्यांना डिच्चू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन
राज्य मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नव्या मंत्र्यांबरोबरच काही जणांना डिच्चू देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्याचवेळी खानदेशचे नेते एकनाथ खडसे यांचा पुन्हा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’476ea024-c932-11e8-aa43-d5f58a141512′]
मुंबईत शिवसेनेला जोरदार टक्कर देणाºया आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी त्याचंी नजर प्रदेशाध्यक्षपदावर आहे़  एक वषार्साठी मंत्रीपद घेण्यास शेलार फारसे इच्छुक नाहीत. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोेले यांच्या जागी मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना संधी दिली जाऊ शकते. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याऐवजी अमरावती जिल्ह्यातील डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिपद दिले जाईल. तर विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छती निश्चित मानली जाते.
वर्षभरापूर्वी त्यांच्यावर घोटाळ्यांचे गंभीर आरोप झाले तेव्हाच मंत्रिमंडळात फेरबदल झाले असते तर त्यांची गच्छंती अटळ होती. आता आरोपांचा धुराळा खाली बसलेला असताना मेहता हे दिल्लीतील एका वजनदार भाजपा नेत्यांच्या माध्यमातून स्वत:चे मंत्रीपद वाचविण्याचा जोरदार हालचाली करतील, असे म्हटले जाते.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07BCGC13F,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’624978e9-c932-11e8-b0c9-6dc90c997f19′]

ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्क लढविले जात आहेत. त्यांच्या समावेशाला भाजपा श्रेष्ठींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही, सांगितले जाते.
खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना पुन्हा मंत्री करण्याचा आग्रह आहे. मात्र, खडसेंबाबत दिल्लीची नकारघंटा होकारात बदललेली नाही. डच्चूच्या संभाव्य यादीत असलेले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे भाजपाचे जुने निष्ठावंत म्हणून मंत्रीपद वाचवतील असे मानले जाते. त्याचवेळी सावरा यांच्याऐवजी थेट कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा चेहरा भाजपाकडे नाही ही बाब सावरा यांच्या पथ्यावर पडू शकते.
निष्क्रियतेचा ठप्पा असलेले पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना वगळू नये, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धरला आहे. जालन्यातील स्थानिक राजकारणाचा विचार करता लोणीकरांची नाराजी दानवेंना ओढावून घ्यायची नसल्याने ते इच्छा नसूनही लोणीकर यांची पाठराखण करीत असल्याचे म्हटले जाते.