अभिनेता रितेश देशमुखने सांगितले त्याच्या आणि जेनेलियाच्या सुखी संसाराचे ‘गुपीत’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सिनेसृष्टीतील बेस्ट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिले जाते. सिनेमात काम करता करता या दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले आणि ते विवाहबंध झाले. त्यांच्या लग्नाला 6 वर्ष होऊन गेली असून त्यांना आता २ मुले देखील आहेत. बॉलिवूडमधील या सुखी कपलच्या सुखी संसाराचे रहस्य काय आहे हे नुकतेच रितेशने सांगितले.

जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर या संबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला असून याच व्हिडिओतून रिेतेशने त्यांच्या सुखी संसाराचे रहस्य सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाचे पाय दाबत असल्याचे दिसत आहे. तर जेनेलिया त्याच्याकडून आपले लाड पुरवून घेत आहे, हेच आमच्या सुखी संसाराचे खरे रहस्य असल्याचे रितेशने सांगितले. या व्हिडिओसोबत जेनेलियाने मस्त कॅप्शन दिले आहे. हॅपी वाईफ…हॅपी लाईफ.. और जीने को क्या चाहिये.

रितेश आणि जेनेलियाच्या पहिल्या भेटीची कहाणी देखील वेगळीच आहे. दोघे ही काही वर्षांपुर्वी पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर भेटले. त्यावेळी जेनेलिया फक्त १६ वर्षांची होती आणि ती तिच्या आई सोबत चालाली होती. रितेश म्हणजे विलासराव देशमुख यांचा मुलगा, मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने त्याला खूप अॅटिट्युड असेल असे जेनेलियाला वाटले होते आणि त्यामुळे तिने रितेशकडे दुर्लक्ष केले, परंतू असे असताना देखील रितेश तिच्या आई सोबत अत्यंत नम्र पणे वागत होता.

मात्र तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान जेनेलिया रितेशही पहिले दोन दिवस काहीही बोलली नव्हती मात्र काही दिवसांने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यांनी बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. चित्रपटाचे शुटिंग संपल्यावर ते मुंबईला आले मात्र ते एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर ते कधी प्रेम पडले हे त्यांचे त्यांनाच कळाले नाही.

आरोग्य विषयक वृत्त

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा