मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 च्या शेवटच्या वॉर एपिसोडमध्ये ‘बाला’ या चित्रपटाच्या स्टारकास्टने सादरीकरण केले. सलमान खानच्या शोमध्ये आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांनी बरीच मस्ती केली. बालाच्या टीमने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांना कठोर प्रश्न विचारले.
बिग बॉसच्या सेटवर बालाच्या टीमने सर्वप्रथम खेसारी लाल यादव यांना प्रश्न विचारला, त्यानंतर आयुष्मान खुरानाने सलमान खानला हटके प्रश्न विचारले. आयुष्मान खुरानाने सलमान खानला असा प्रश्न विचारला की, कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला माहित झाले की, हा चित्रपट चालणार नाही?
यावर उत्तर देताना सलमान म्हणाला की, असे बरेच चित्रपट आहेत. त्यानंतर जेव्हा आयुष्मान खुरानाने अशा चित्रपटाचे नाव सांगण्याची विनंती केली तेव्हा सलमान खानने ‘सूर्यवंशी’ चे नाव घेतले. आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर म्हणाले की, त्यांना सूर्यवंशी चित्रपट खूप आवडतो. आयुष्मान खुराना यांनीही सूर्यवंशीमधील डायलॉग देखील सांगितले.
1992 मध्ये सलमान खान, अमृता सिंग यांचा स्टार चित्रपट ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले होते. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त अमृता सिंग, शीबा आकाशदीप, सईद जाफरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !