संंभाजी भिडे म्हणतात, डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मागील काही दिवसापासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मग विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते असो किंवा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता हे विधान असो. अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं त्यांनी केली आहेत. आता तर त्यांनी चक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान केलं आहे. त्यामुळे संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एका मराठी वृत्त वाहिनिच्या कार्यक्रमात भिडे बोलत होते. ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांनी मनूचीं काैतुक केले होते हा इतिहास आहे. एवढेच नाही तर राज्यस्थान विधानसभेच्या भवनाच्याबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर गेले होते.

[amazon_link asins=’B07F5SZBMX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’86f3d0d2-8973-11e8-b568-f569a908a1e0′]

तसेच मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याचा पुरावा सुद्धा मिळेल आणि तो पुरावा शोधण्याचं काम मीडियाने करावे असे भिडे यांनी म्हटले आहे.मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला आहे. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या आंब्याच्या विषयावर देखील बोलले, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते. गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.