नवी दिल्ली : बॅंक खातेधारकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन योजना तयार करत आहे. गेल्या काही दिवसापुर्वी संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सितीरामन यांनी घोषणा सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यावेळी निर्मला सितारामन यांनी सांगितले होते की, दुसरीकडुन बॅंक खात्यात जमा होणाऱ्या पैशावर नियंत्रण आणण्यात येणार आहे. सरकार बॅंकाची स्थीती सुधारण्यासाठी तसेच अकाउंट होल्डर्स मजबुत करण्यासाठी पावले उचलणार आहे.
दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या आतापर्यंत बॅंक खात्यात त्याच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय पैसे जमा होतात. फक्त पैसे जमा करण्यासाठी संबंधीत व्यक्तीचा बॅंक खाते नंबर माहिती असला पाहिजे. बॅंक खातेधारकांच्या खात्यात कॅश डिपॉजिट मशिनच्या माध्यमातुन १२ अंकाचा खाते नंबर टाकुन पैसे जमा होतात. तसेच बॅंक शाखेत एक पावती भरुन पैसे जमा होतात. काही बॅंका नॉन होम ब्रांचमध्ये बचत खात्यात पैसे जमा करण्यावर शुल्क आकारतात मात्र आता पैसे जमा करण्यासाठी प्रास्ताविक बदलासह आधी परवानगी द्यावी लागणार आहे.
अनेक व्यक्तींच्या खात्यात नोटाबंदीच्यावेळी बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. खातेधारकांच्या परवानगीशिवाय किंवा त्याच्या माहितीशिवाय त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. विशेष म्हणजे ,जन-धन खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. त्यामुळे खाते धारकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.
जाणकारांच्या मते य़ांमध्ये बदल होणे गरजेचे होते. कारण खातेधारकांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिले असता अशा प्रकारच्या ठेवी पाहिले तर त्याच्या करात वाढ होउ शकते. दरम्यान सध्या अशा प्रकारची कोणतीही बॅंकींग योजना लागु करण्यात आलेली नाही. यासाठी बॅंकिंग रेग्युलेटर काय पाऊले उचलणार, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे व वाट पाहावी लागणार आहे.
‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा
‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम
ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी
‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य
‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान
अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’ विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी
शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते दूर