द्रुतगती महामार्गावर ट्रकने ६ कामगारांना चिरडले, एकाचा मृत्यू

खोपोली : पोलीसनामा ऑनलाईन – रसत्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सहा कामगरांना उडवले. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवार) सकाळी नऊच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खोपलीजवळ झाला.

नरेश दादुलाल मर्सकोले (वय-२७ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर सुरेश मर्सकोले, सुनील नंदलाल कर्वती, नरेंद्र बुटाके गंभीर जाखमी झाले आहेत.

अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आज सकाळीपासून आयआरबीने रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु केले आहे. हे काम सहा कामगारांकडून करण्यात येत होते. सकाळी नऊच्या सुमारास कामगार रस्त्यावर पांढरे पट्टे मारत होते. त्यावेळी मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एमएच ०४ ईबी ८१५३) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावरुन गेला. यामध्ये नरेश याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य कामगार गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगारांना रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीचा वेग काही वेळा करीता मंदावला होता. माहामार्ग पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.