जालनाः तलावात सहा मुली बुडाल्या, तिघींचा मृत्यू

जालनाः पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील घनसावंगी परिसरातील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या सहा मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली . यापैकी तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. संगिता बजरंग रणमले, साैमित्रा दत्ता सातपुते, आणि आणखी एक या मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना आज दुपारी घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जालना शहरातील घनसावनगी येथील मच्छिद्रनाथ चिंचोली तलावामध्ये या सहा मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी काही मुली तलावामध्ये उतरल्या. तेव्हा तीन मुली पाण्यात बुडू लागल्या, घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी जाळ्याच्या साह्याने मुलींना तलावा बाहेर काढले. यावेळी दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तीन मुलींना वाचवण्यात यश आले. मृत झालेल्या आणखी एका मुलीचा शोध सुरू असून जना भानुदास रणमले असे बेपत्ता असलेल्या मुलीचे नाव आहे. तर कल्याणी मधुकर खोसे, ज्योती अशोक हेमके, रणमले असे वाचवण्यात आलेल्या मुलींची नावे आहेत.