झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची सामुहिक आत्महत्या

झारखंड :  वृत्तसंस्था 

झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील ६ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील ११ जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना हा प्रकार समोर आला आहे.
[amazon_link asins=’B0784CMFCP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2094bffc-87e5-11e8-992e-638cc3ded2ad’]

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सहा सदस्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवले आहे. यातील ५ जणांनी गळफास घेतला तर एका व्यक्तीने छतावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील ११ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.