सावंतवाडीत स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांची गाडी जाळली

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकांचे वारे सुरु झाले की कोकणात भांडणे, मारामाऱ्या सुरु होतातच, असे सांगितले जाते. त्याचा प्रत्यय मंगळवारी पहाटे आला. स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोव्हा कार कोणीतरी पेटवून दिली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोडावर असा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.  संजू परब यांनी आपल्या इमारतीच्या खाली इनोव्हा कार पार्क करुन ठेवली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक तिला आग लागली. नगरपालिकेच्या बंबाच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र  आगीत पूर्णत: कार जळून खाक झाली. ही आग जाणिवपूर्वक कोणीतरी लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.