भारतीय जवानांची चीनकडून सुनियोजित हत्या, ‘या’ भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जवानांची चीनकडून सुनियोजित हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप भारताच्या एका दिग्गज खेळाडूने केला आहे. या खेळाडूच्या वक्तव्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 43 सैनिक जखमी झाले.

या झटापटीत 17 भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी भारताच्या एका खेळाडूने धक्कादायक आरोप केल्याचे पहायला मिळत आहे. कारण त्याने चीनवर भारतीय जवानांची सुनियोजित हत्या केल्याचे म्हटले आहे.

चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाले. या गोष्टीचे सर्वच स्तरातील भारतीयांना दु:ख आहे. या घटनेनंतर भारतीय खेळाडूंनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण ही श्रद्धांजली वाहत असताना भारताच्या एका दिग्गज खेळाडूने असे काही वक्तव्य केले आहे की, त्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.

बायचुंग भुतियाचा गंभीर आरोप
लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने एक गंभीर आरोप केला आहे. बायचुंग म्हणाला की, चीनने काही आठवड्यांपूर्वीच आपल्या नागरिकांना भारत सोडायला सांगितले होते. त्यानंतर चीनने हल्ला केला आणि त्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. माझ्यामते ही चीनने भारतीय जवानांची केलेली सुनियोजित हत्या आहे. याबाबत भारत सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत.