गायीची रक्षा करताना हिंदुस्थान स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश – उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गायींची रक्षा करताना हिंदुस्थान आज महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश बनला आहे याची लाज वाटत आहे. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारचा समाचार घेतला आहे.

गायी कापा असं कधीच म्हणणार नाही, मात्र देशातील एकंदर परिस्थिती पाहता चिंता निर्माण करणारी आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’73d5e721-8e31-11e8-8a4b-bfb02befed81′]

गेल्या तीन वर्षात या देशात हिंदुत्वाच्या नावावर उन्माद सुरु आहे, ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली. गोमाता वाचली पाहिजे पण मातेचं काय ? महिलांना न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का, याच्यामागे लागणार असाल, तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही असा हल्लाबोल उद्धव यांनी या वेळी बोलताना केला आहे.

याप्रसंगी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. राष्ट्रीयत्व हे आमच हिंदुत्व आहे. मंदिरात जाऊन घंटा वाजवणारा हिंदू नकोय, शेंडी, जानव्यातल हिंदुत्व मला नकोय. तो जो विचार होता तो आज प्रभावीपणे मांडण्याची, अंमलात आणण्याची गरज आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

जाहिरात