Giriraj Singh: In Pakistan there are talks of ‘ghazwa-e-hind’, which means 'Islamikaran' of India(spread of Islam)& have gained momentum after Pulwama attack.Unfortunate that in India, ppl like Naseeruddin Shah & Kamal Haasan have become agent of those who talk of ‘ghazwa-e-hind’ pic.twitter.com/d7MbMrxOzO
— ANI (@ANI) February 19, 2019
गिरीराज सिंह म्हणाले की, “पाकिस्तानात गजवा-ए-हिंदची चर्चा होत होती. याचा अर्थ भारताचे इस्लामीकरण असा होता. पुलवामा हल्ल्यानंतर याला गती मिळाली आहे. आपले दुर्देव आहे की, भारतात नसरुद्दीन शाह आणि कमल हसन सारखे लोक पाकिस्तानचे एजंट बनले आहेत. जे ही गजवा-ए-हिंदची भाषा करतात.”
गिरीराज सिंह यांनी यापूर्वीही पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला होता. ते म्हणाले की, “सिद्धू राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुन अशी विधाने करीत आहेत. काँग्रेसकडून मतांसाठी अशी विधाने होत आहेत. सिद्धू यांचे विधान लोकशाहीसाठी नव्हे तर मतशाहीसाठी आहे. मात्र, भारतीय सेनेच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे” असेही ते यावेळी म्हणाले.