“तुला का पाहते रे” मालिकेचा टीआरपी घसरला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांचा विवाहसोहळा शाही झाला हे ‘तुला पाहते रे’ चा प्रेक्षकवर्ग अगदी मान्य करेल. पण ही लगीनघाई मालिकेला आणि पर्यायाने ‘झी मराठी’ ला भोवली की काय,असा प्रश्न आता पडत आहे. कारण लग्नानंतर घडणाऱ्या घडामोडींमुळे मालिकेचा टीआरपी घसरला आहे.

मिस्टर अँड मिसेस सरंजामेंच्या आयुष्यात घडामोडी सुरु आहेतच, पण याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर पडला आहे. लग्न उत्तम झालं म्हणून मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर टीआरपी मिळाला आणि मालिका नंबर 1 ला गेली. पण लग्नानंतर जे काही सुरु आहे, त्यामुळे हा टीआरपी घसरला आणि मालिका तिसऱ्या नंबरवर आली. खरं तर मालिकेच्या टायटल साँगमध्ये दिसणारी शिल्पा तुळसकर म्हणजेच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनी सगळ्यांच्या कुतूहलाचा भाग आहे. आता लग्नानंतर तरी तिची चाहूल लागेल, असं वाटत असताना हे भलतंच प्रकरण सुरु झालं आहे.

मालिकेत एखादा ट्रॅक प्रेक्षकांना आवडला, की तो वाढवला जातो. पर यहां तो उलटी गंगा बह रही है… आता लग्न झालं विक्रांत-इशाचं…म्हणजे आता त्यांच्या लव्ह स्टोरी मधला इंटरेस्ट कमी झालाय… आता राजनंदिनी आणि त्या बंद दरवाजाबद्दल प्रेक्षकांना जास्त रस आहे. झी मराठीच्याच मालिका पाहिल्या, तर होणार सून मी या घरची, राधा ही बावरी, लागिरं झालं जी… या सगळ्या मालिकांचा टीआरपी जोडप्यांच्या लग्नानंतर कमी झालेलंच दिसला आहे. आता काही अपवादही असतात, उदाहरणार्थ आपल्या राणादाची ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका. यावेळी दुसऱ्या नंबरवर हीच मालिका आली. देशात जसं इलेक्शनचं वातावरण आहे, अगदी तसंच मालिकेतही आहे.

सांगण्याचा हेतू हाच की आता प्रेक्षकही चॉईस करायला शिकले आहेत. मालिका आवडते म्हणून वाट्टेल ते बघत बसण्यापेक्षा मालिकेतला विषय आवडेनासा झाला की मालिका चेंज किंवा चॅनेल चेंज… त्यामुळे निर्मात्यांनी वेळीच सावध व्हावं लागेल.