आंदोलकांवर झालेले खटले मागे घ्या अन्यथा भडका उडेल : उदयनराजे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (३ ऑगस्ट) रोजी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे पत्रकार परिषद झाली असता त्यांनी यावेळेस मराठा क्रांती मोर्चाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांवर झालेले खटले मागे घ्या अन्यथा भडका उडेल तर इतकेकज नव्हे तर, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. याची राज्यकर्त्यांसह विरोधक आणि राज्यातील सर्व आमदारांनी जाणीव ठेवावी. असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला केला. त्यासाठी वेळ काढून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आधीच २५ ते ३० वर्ष उशीर झाला आहे. लोकसभा, राज्यसभा, न्यायालय या फेऱ्यात पुन्हा ३० वर्ष उशीर नको. अन्यथा एकदा घोषणातरी करून टाका की पुढची ३० वर्ष आरक्षण देत येणार नाही. काहीतरी भरीव सांगा.
[amazon_link asins=’B0769Y59TR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7f7c0d38-96ea-11e8-941a-8dba2c5d2256′]

इतकेच नव्हे तर सर्वोच न्यायालयाने शिथिल केलेला अॅट्रोसिटीचा कायदा पूर्ववत करण्यासाठो केंद्र सरकारने दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

राज्यात ५४ मूक मराठा मोर्चे निघाले. त्याची जगभरातून दखल घेतली गेली. पण त्यावेळी आश्वासन दिले आणि नंतर या प्रश्नाला बगल दिली. त्याच वेळी हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला गेला असता तर आज ही परिस्थिती ओढविली नसती.आरक्षणाच्या मुद्याकडे राजकारण किंवा इतर वैयक्तिक गोष्टींशी जोडू नये. आज या समाजावर वेळच अशी आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही.सत्तेवरील राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनीहो माणुसकीच्या नात्याने हे समजून घेतले पाहिजे. आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी कोणताही मार्ग राहत नाही तेव्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही. असेही त्यांनी म्हंटले