Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात ! ”देवेंद्र फडणवीसांची आवस्था म्हणजे मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू…”
मुंबई : Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसलेत. त्यांची अवस्था आता ‘मला नाही अब्रू मी कशाला घाबरु’, अशी झाली आहे. मला अब्रूच नाही. मी असाच आहे, काय बोलणार अजून? निर्लज्ज असतो तोच सुखी असतो, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, तसेच फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, यांचा उल्लेख पाव उपमुख्यमंत्री म्हणून केला जातो. नितिन गडकरी बोलले जो निष्ठेने काम करतो त्याला किंमत नाही, हे अगदी खरे आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कुठल्या शब्दांत वर्णन करावे तेच कळत नाही. कारण फडतूस म्हटले, नालायक म्हटले, कलंक म्हटले, काही फरकच पडत नाही. आता बेगुमानपणाने वागत आहेत. त्यांची आवस्था निर्लज्जम सदासुखी अशी झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशात आता करोना व्हायरस नाही. पण एकाधिकारशाहीचा व्हायरस आहे. या व्हायरसपासून लांब राहा. आज एक भ्रष्टाचारी भाजपात आला हा भाजपाला धक्का आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मला मोदींना प्रश्न विचारायचाय की तुमची स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून इतरांचे पक्ष फोडता का? पण शेतकऱ्यांचे काय? भाजपाची काही लायकी नाही म्हणून दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात का?
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर, आज अशोक चव्हाणांना फोडले. ही फोडाफोडी करुन काय मिळवले? दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येऊन ठेपले. त्यांना गृहमंत्री आणि पंतप्रधानांना भेटायचे आहे पण पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याची गरज काय आहे? असे सवाल ठाकरे यांनी केले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ashok Chavan | भाजपा प्रवेशानंतर आदर्श घोटाळ्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ”हा चिंतेचा विषय…”