शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, जास्त पाणी पिणेही नुकसानकारक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाण्याच्या बाबतीत अनेक संशोधनांमध्ये वेगवेगळे मत व्यक्त करण्यात आले आहे. वास्तविक कार्य आणि आसपासच्या वातावरणावर पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून असते. काही वेळा जास्त पाणी पिणेही नुकसानकारक ठरू शकते. जेवणात जास्त पाणी असणारे पदार्थ असल्यास कमी पाणी लागते. दूध, सरबत, कल्ड्रिंक, रसाळ फळे, ताक, दही, चहा, कॉफी आदी घेतल्यास दिवसभरात घेत असलेले पाणी एक लिटरने कमी होऊ शकते.

सामान्य वातावरणात व्यक्तीला दिवसभर १२-१६ ग्लास (३ ते ४ लिटर) पाणी पिणे आवश्यक आहे. एअरकंडिश्नरमध्ये जास्त काळ राहणाऱ्या व्यक्तीला २.५-३ लिटर पाणी पिणे पुरेसे असते. उन्हात काम करणाऱ्या आणि व्यायाम करण्यासाठी ५-६ लिटर पाणी पिणे प्यावे. प्रत्येकाचा जग किंवा बॉटल वेगवेगळी ठेवली पाहिजे. यामुळे पाणी किती घेतले हे लक्षात येईल. कामामध्ये पाणी पिणे विसरायला होते. यासाठी बॉटल जवळ ठेवावी. यामुळे पाणी प्यायचे लक्षात राहील. एकदाच सर्व पाणी पिऊ नये. थोड्या-थोड्या वेळाने एक-एक कप पाणी प्यावे.

पाण्यामुळे लाळ बनते, तिच्यामुळे अन्न पचवायला मदत होते. म्युकस मेंबरेन (त्वचेवरील थर) च्या मऊपणासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच पेशींच्या निर्मितीसाठी, शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी, सांध्यात मऊपणा आणण्यासाठी, मेंदूत हार्मोन, न्युरो ट्रासमीटर बनवण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी, पाठीचा कणा आणि मस्तकासाठी शॉक एब्जॉर्बरसाठी, अन्नाच्या पोषण द्रव्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी, शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.

गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने किडनीवर जास्त दाब पडतो. शरीरातील पेशींना इजा होऊ शकते, सोडियमची प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते, अति पाणी पाचक रसाचा परिणाम कमी करते, अन्न उशिराने पचन होते. यामुळे पाणी योग्य प्रमाणात प्यावे. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने जास्तीची चरबी तयार होऊन यामुळे हृदयविकार होऊ शकतो.